Tuesday, July 17, 2007

Kid's Breakfast (मुलांचा खाऊ )

१९९० मध्ये झालेल्या संशोधनामध्ये "मुलांनी न्याहरी करावी का?" या विषयावर असे आढळले कि जेवल्यानंतर दोन तासांनी मुलांनी खाल्लेल सर्व अन्न त्यांच्या वाढ़ीमुळे व खेळ्न्यामुळे संपुन ते पुन्हा भुकेले होतात.


निष्कर्ष: मुलांच्या चांगल्या वाढिसाठी त्यांना दर दोन ते अडिच तासांनी मनसोक्त खायला अन्न उपलब्ध पाहिजे. शालेत डबा द्यायला पाहिजे व रात्रीचा ८ तासांचा उपास मोडायाला पोटभर गरमागरम मोहविनारा नाश्ता द्यायला हवा. मुले अनुकरनाने शिकतात म्हणून आई-वडिलांनी प्रथम नाश्ता करयाला हवा.

नाश्त्त्याला खावं तरी काय? मांसाहार बरा कि शाकाहार बरा?

जागतिक आरोग्य संघटनेच्या १९८५ मध्ये असे लक्षात आले कि, दोन वाटी भात आणि एक वाटी डाळ ह्यांच्या मिश्रनापेक्षा श्रेष्ठ अन्न या भुतलावर नाही. मांसाहारा इतकीच उत्कृष्ट प्रथिने ह्यातुन मिळ्तात. तसेच वाटिभर हिरवे पदार्थ, कोशींबिर, पालेभाज्या किंवा वाटिभर फळे रोज खायला मिळाली तर कुठल्याही टाँनिकची गरज नाही. हेच अन्न जर बाजारातुन विकत घेऊन खाल्लं तर त्याला घरच्या अन्नापेक्षा दहापट जास्त किंमत पडते.


दाळ-तांदुळ पाणी टाकून गरम केले कि, अनुक्रमे वरण व भात बनतो. चनादाळ, व तांदुळ सुके भाजल्यास अनुक्रमे चने व कुरमुरे, पोहे बनतात. तात्पर्य, दाळ-भात व चने-कुरमु-यात काहीही अंतर नाही. त्यांनी चने, कुरमुरे, शेंगदाणे खाल्ले तरी चालेल.

जे अन्न आपणास पुरेसे उष्मांक (शक्ति) देते ते आपल्याला प्रथिनांचा पुरेसा पुरवठा करते. तेव्हा आपण प्रथिने कमी पडण्याचा विचार करायला नको. फक्त उष्मांकाचा विचार करायला हवा.

कमीत कमी पैशांमध्ये जास्तीत जास्त उष्मांक (शक्ति) कोणत्या अन्नामध्ये मिळतील? उदा.: १ रुपयांचे १०० ग्रँम सोयाबीन खाऊन ४२० कँलरिज मिळ्तात, तर १०० ग्रँम शेंगदाने (१.५० रु. चे) खाऊन ५०० कँलरिज व २२ ग्रँम प्रथिने मिळ्तात, तर १ रु. चे १०० ग्रँम म्हशिचे दूध केवळ ६७ उष्मांक शक्ति व ४ ग्रँम प्रथिने मिळ्तात.


अशाप्रकारे दूध १० पट महाग पडते. दुधावर अनाठाई ख़र्च केल्यास इतरत्र काटकसर करावी लागते. निसर्गतः गाईच्या दुधामध्ये ९० टक्के पाणी तर म्हशिच्या दुधामध्ये ८५ टक्के पाणी असते. मग आधी दूधवाला व नंतर आई, आजी त्यात आणखी पाणी टाकतात शेवटी २०० ग्रँम दुधामध्ये १० ग्रँम अन्न आणि १९० ग्रँम पाणी असते. हया पाण्यामुळे पोट भरते, परंतु भूक मात्र मरते. सकाळी घरातिल मोठे लोक चहा पितात व मुलांना दूध देतात. अँसिडिटिच्या रोग्यांना खूप भूक लागते. ती मरावी म्हणून दूध देतात. सकाळी उपशिपोटी दूध दिल्याने मुलांची भूक मरते. म्हणून आधी पोटभर नाश्ता देउन नंतर दूध द्यावे. आयुर्वेद तर भुकनाशक दूध केवळ रात्री झोपण्यापुर्वी द्यावे, असे शिकवतो.

आपण जर अशक्त असाल तर ह्याचा अर्थ आपणास जेवढे अन्न लागते तेवढे मिळत नाही. तेंव्हा आपण तर नाश्ता केला, आपला आहार वाढविला व काही आजार असेल तर डाँक्टरकडून दूर करून घेतला तर आपण नक्कीच सशक्त होऊ शकू व शंभर वर्षे सुखाने जगु शकू.


सर्वसाधारणपणे १५ ते २० टक्के आहार कमी पडल्यामुले भारतीय मुले व लोक अशक्त आहेत. नेहमिच्या आहाराव्यतिरिक्त १०० ग्रँम भाजलेले शेंगदाणे दिवसभरामधे २-२, ४-४ दाने करून एखाद्या व्यक्तिने खाल्ले तर त्या व्यक्तिला २२ ग्रँम प्रथिने आणि ५०० कँलरिज शक्ति ज्यादा मिळेल आणि एवढिच घट सहसा प्रत्येक माणसाच्या व मुलांच्या आहारामध्ये पडते. चने, कुरमुरे ह्यांच्या १०० ग्रँम मिश्रणातुन ३५० कँलरिज उर्जा शक्ति व १५ ग्रँम प्रथिने मिळतील. १०० ते १५० ग्रँम चने, कुरमुरेदेखिल दिवसभरामधे नेहमिच्या आहाराव्यातिरिक्त त्या व्यक्तिने अथवा मुलाने खाल्ले तरी चालेल. ह्याची सुरुवात नाश्त्याने करावी.

मुलांचे वजन दरवर्षि दोन अडिच किलो वाढायला हवं. पण मूल शाळेत गेल्यावर मात्र त्याचं वजन १ किलोने वाढ़ते व त्याची चरबी वाढण्याच्या ऐवजी कमी व्हायला लागते. ह्याचा अर्थ असा होतो कि, मुलांचे पोट भरत नाही. त्यामुळे त्यांच्या वजनात घट होते. ह्याला उपाय?

सर्वानी सकाळी नाश्ता, मुलांना शाळेत डबा व खिशात खाऊ हा हवाच हवा.

Wednesday, May 9, 2007

पुदिन्याचे गुणधर्म : USEFUL MINT / WILD MINT

Page copy protected against web site content infringement by Copyscape

वातलोप, पुतिनाश किंवा वाईल्ड मिंट या नावाने ही वनस्पति ओळखली जाते. मुरमु-याच्या भेळेमध्ये पुदिन्याची चटणी वापरतात. सर्वांच्या ओळखीचा असा हा पुदिना जमिनीवर सरपटणारे एक (झाड) किंवा क्षुप आहे. या झाडाची पाने गोल असतात.आजकाल सर्व बागेंमधुन किंवा बगीच्यामधून पुदिन्याची लागवड करतात.

पुदिन्याचे गुण:

पुदिना हा उष्ण रुक्ष आहे. याला भूक वाढविणारा म्हणजेच दिपन असेही म्हणतात. हा आर्तवजनक, संकोच-विकास प्रतिबंधक उत्तेजक आहे. आहारामध्ये याचा वापर पाचक म्हणून करतात.

मंद झालेल्या भुकेवर पुदिन्याचा उपाय:

सकाळी उठल्यावर ते चमचे रस रात्री नुसता प्याला तरी चालतो किंवा त्यात थोडेसे सैंधव टाकून प्यावे. आपली मंद झालेली भूक हळुहळू सुधारते. वरचेवर होणारे गँसेस याने कमी होतात.

पोटफुगीवर पुदिन्याचा उपाय:

पोटफुगीवर पुदिनारस चमचा +अदरक रस अर्धा चमचा +लिंबू रस चमचा +सैंधव चिमुटभर घेतल्यास पोटफुगी थांबते. गँसेस कमी होतात शौचासही साफ होऊ लागते.

उलटी वर पुदिन्याचा उपाय:

पुदिनारस २० ते ३० थेंब +मध १० थेंब चाटवावा. उलटी थांबते.

काविळेवर पुदिन्याचा उपाय:

काविळेच्या सुरुवातीस याचा वापर उपयुक्त ठरतो.

प्रसुतीज्वरात पुदिन्याचा उपाय:

२ ते ४ चमचे रस रोज घ्यावा. रुग्णाची प्रकृति पाहून हळुहळू मात्रा वाढवली तर रुग्णास मानवते.

ज्वराने उष्णतेने शरीर एकदम गरम होऊ लागते. अशा वेळी पाण्यातून याचा वापर फायदेशिर ठरतो. चहासारखा उकळून त्यात साखर, अदरक इत्यादी वापरावे, आव्यशक वाटल्यास गवती चहा लक्षणानुरुप लवंग, दालचीनी टाकता येते.

चक्कर आल्यास पुदिन्याचा उपाय:

चक्कर येणा-या रोग्यास पुदिन्याच्या पाल्याचा रस उपयुक्त आहे.चक्कर आल्यास रसाचे ते थेंब नाकात सोडावे.

पुदिन्याच्या वाळलेल्या पानांचे चूर्ण:

दात घासण्यास उपयुक्त आहे. याने दात स्वच्छ व पांढरे होतात.

पहाड़ी पुदिना (MENTHA VITIDIS):

याचे तेल बाजारात मिळते. पेपरमिंट सारखेच परंतू गुणास जरा कमी दर्जाचे असते. याचा वापर कफज्वरात होतो. तोंड आल्यावर अगर तोंडात व्रण असल्यास याच्या काढ्याचा गुळण्या कराव्यात. आराम मिळतो.

पुदिन्याचे फुल:

पुदिन्याच्या फुलाला पुतिनाश कर्पूर, पुदिनेका कपुर किंवा मेंथाल म्हणून ओळखतात. याचे उत्पत्तिस्थान चिन किंवा जापान मध्ये असून, कश्मीर हिमाचलच्या पश्चिम भागावरती याची लागवड करतात.

सुकवलेली ही पुदिन्याची वनस्पती इराण मधून येते. सध्या प्रत्येक केमिस्टच्या दुकानांमधुन ती विक्रिसाठी उपलब्ध आहे.विडयाचा पानात पुदिन्याचा वापर करतात.

मेन्थोलच्या लांब षटकोनी खड्यांची परीक्षा करावयाची झाल्यास :

जर याला पाण्यावर टाकले तर तो तरंगते तोच खरा मेंथालचा खडा होय.

चीनी पुदिन्याचे फुल हे प्रथम तिखट लागते नंतर त्याचा कडसरपणा येतो. पुदिन्याचा फुलाने जखमेतील घाण कमी होते तसेच याने कफ कमी होतो.

पुदिन्याचा रस हा पोटातुन घेतल्यास आमाशयाची अशक्तता कमी होऊन जुलाब कमी होण्यास मदत होते. पोटातिल वात कमी होतो. तसेच इतर वातरोग, सांधेदुखी, डोकेदुखी यांवरही उपयोग होतो.

पुदिन्याचा मूत्रअश्मरी वर उपाय:

मुतखडा, मुत्राशयातिल (bladder मधिल) मूत्र खडा हळुहळू पडण्यास मदत होते, पडताना होणारा त्रास वा वेदना कमी होतात.

गर्भवतिच्या उलट्या पुदिन्याच्या रसाने थांबतात. आतड्याच्या सर्व रोगांवर फुलाचा किंवा तेलाचा वापर करतात.

त्वचेवर आलेल्या बधिरपनावर पुदिन्याचे फुल चोळतात. त्वचेवर खाज येत असल्यास तेलात मिसळून त्वचेवर लावावे. नायटा, गजकर्ण, सौम्य आकाराचा इसब यांवर हे चोळावे, खाज कमी होते.

दमा झालेला असल्यास पुदिन्याच्या अर्काची वाफ घेतल्यास आराम वाटतो. दम्याचा खोकल्याचा वेग कमी होतो. पुदिन्याच्या अर्काचा शेक हा छातीच्या कमी भागावर तसेच पाठिवर कापडाने द्यावा.

दातदुखी किडलेले दात यांवर पुदिन्याचा अर्क कापसातुन लाव्ल्यास दातदुखी थांबते दातातिल किड कमी होते. पेपरर्मिंटची वापरन्याची प्रथाही अशीच आहे.

Blogarama - The Blog Directory Automotive Blogs - Blog Catalog Blog Directory Promote Your Blog Blog Portal